निघाली लोकल कर्जत
मुंबईला गर्जत .
पहा प्रत्येक थांबा ,सांगतो मुंबईचा हंगामा.
जाता कर्जत लागते वांगणी ,
एकू यायला लागती लोकल ची ती गाणी .
पुढे जाता येतं बदलापूर , जीथे वाढतो लोकल चा तो पूर ,
तिथलाच तो कवी आहे आतुर, नाव त्याचं आकाश शोधात आहे मुंबईत प्रकाश .
कसता कंबर येतं अंबरनाथ ,
येते ती नंतर विठठ्लाची वाडी .
उल्हास जाता कल्याण ते येतं ,
मुश्कीलीने मिळाली जागा तर त्याच कल्याणचं होत .
थोडी विश्रांती घेता डोंबिवली लागते ,
आणी ठाणे येता येता गर्दी ती ओसरते .
उठती तिथे माणसे चांगली ,
देती जागा थाकलेल्याला ,मिळते मुंबईत माणुसकी पाहायला .
ठाण्य़ा पुढे येतं ते कुर्ला ,
तिथ पुढे गर्दीचा ओघ ओसरला .
चेत्य भूमीची ती भूमी म्हणती त्यास दादर ,
पुढे मस्जिद येता होते नमाज सादर .
जाऊ द्यावं लागतं भायखला ,
शिवबाचं ते सिएसटी यायला …
शेवटी लोकल पोहोचवते की हो मुंबईला .